Posts

मन, आत्मा आणि समाधान...!

मन,आत्मा आणि समाधान...! ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असा प्रश्न पडला असेल..!🤔तर मग काहींच्या दृष्टीकोणाच्या मते त्याच उत्तर काहिही असू  शकतं..🤷🏻‍♂️ पण माझ्या मते ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणसाचं मन ...तर ह्याचा प्रश्न पडला असेल की मनच का..? बाकीच्या गोष्टी पण आहेतच की..! ही झाली पहिली बाजू पण; दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याचंही उत्तर असू शकतं की मनच....म्हणजे बघा ना अगदी कधीही आपल्याला कुठेही कल्पना करायची म्हणल तर सर्वात आधी आपलं मन तिथे पोहोचतं. आणि नंतर आपल्या कल्पना शक्ती दाटून येतात. पण मन ही एक भावना असून त्याला आपण एका विशिष्ट गोष्टीचा दर्जा दिलाय. आता ह्याच भावनेच्या भरात आपण अगदी काहीही बोलून जातो किंवा एखाद्या ला दुखवू व शकतो व भावनेला मनात साठवूही शकतो, कारण....! मन ही एक आनंद आणि दुःख व्यक्त करण्याची जागा असते. आपण बोलतो बघा मन हलकं झालं, मनाला बरं वाटलं इ.पण समजा कदाचित तेच जर मन कुणी दुखवलं तर...? त्रास तर होतोच ना. मग त्याच मनाची आपण समजूत घालतो आणि पुढे चालतो. पण कधी कधी अशीही वेळ येते की मन तयारच होत नाही एखाद्या गोष्...

"स्टेटस"

स्टेटस....!    "स्टेटस" अगदी ज्यावेळी पहिल्यांदा हा शब्द ऐकलं त्यावेळी काय लक्षात आलं..? अर्थातच व्हाट्सअँप स्टेटस.😅 काय नक्की कशासाठी ?🙄 आणि कुणासाठी ?🤔 ठेवायचं.तर आजकाल उठ सूट काहीही स्टेटस ला बघायला मिळतं,मग काहीजण ते बघत पण नाहीत आणि पुढे पुढे ढकलू लागतात.तर का की त्या स्टेटस काहीही अर्थ नसतो आणि बघण्यात फुकटचा वेळ वाया जातो😪 म्हणून,तर स्टेटस हे एक छंद,आवड,मनोरंजन किंवा आपल्या भावना थोडक्यात सगळ्यांना काळाव्या ह्यासाठी ठेवायचे असतात.😃न की लोकांना इंप्रेस करण्यासाठी किंवा स्वतःचा खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी.स्टेटस जरूर ठेवा पण ठेवताना एका गोष्टीचं भान असावं की त्यामागचा उद्देश आणि भावना महत्त्वाच्या असतात.👏त्यामुळे सुंदर स्टेटस जरूर ठेवावं पण हे ठेवण्यासाठी चुकीच अस काही करू नये.नाहीतर आजकाल दुसऱ्याचे कॉपी करून त्याच नाव खोडून Share करण्याची वाईट सवय लोकांना लागलेली असते.😂अगदीच त्यापुढे ही जाऊन तर धमकी वजा स्टेटस बघायला मिळतात,काहीजण तर वेळोवेळी आपली स्वतःची Update देतात उदा. Way To..,Eating Something,@जागेचं Location etc etc🤐त्यामुळेच काहीजण वैयक्तिक बघायला टाळाटाळ ...

तिन्हीसांजेचा स्पर्श...

मागच्या भागातल्या रात्री च्या वर्णन करण्याचा थोडासा भाग राहिला होता, काही कारणांमुळे तो करता आला नाही त्यामुळे आज आपण तो करण्याचा प्रयत्न करू आणि आज शेवट सुध्दा करू. दबून अगदी मेलेल्या स्वप्नांना ही ती नाकारत नाही ... त्यांना आपलंसं करून शांत ठेवते... दिवस चुका घडवतो फक्त,रात्र त्या चुकांना सुधारण्याचा विचार  देऊन जाते... दिवस वार करत राहतो,रात्र आधार देऊन जाते... या असंख्य ओळखी-अनोळखी पात्रांच्या नाटकात  'ती' आणि 'मी'  मात्र एकमेकांना सर्वात जवळची वाटणारी रोजची बेधुंद "रात्र"... मी ही एकटा आणि ती ही एकटी...दोघांना एकमेकांशिवाय बाकी कोणाचीही  गरज नाही असं मला वाटतं... माझ्या सगळ्या भावना, वेदना, प्रश्न या सगळ्यांना या जगात प्रेमानं कुशीत फक्त रात्र च घेते... बाकी सगळ्याच जणांनी मला अगदी सहज लाथडलं आहे रात्रीनं मला हवं तसं स्वीकारलं आहे... म्हणूनच मी "निद्राशतरू"...! मला माझ्या एकटेपणा मध्ये तटस्थ उभा राहून  साथ देणाऱ्या त्या "रात्रीला" माझ्या एकमेव जोडीदाराला मला निद्रेत जाऊन  एकटं सोडायचं नाही आहे... काही क्षणांसाठी का असेना पण माझी माझ्या...

तिन्हीसांजेचा स्पर्श...

चला तर काही काळासाठी मनाला धुंडारून मनसोक्त जगायला काहीतरी कारण मिळालं, म्हणजे नेमक्या मूळ कारणासाठी ची रात्र आजकाल एकदम जवळची वाटू लागली, स्वप्नातल्या सहवासातली, मनमोकळ्या करणाऱ्या मित्राची जागा घेतली. आणि कळून सुद्धा दिले नाही ... "रात्र फक्त खऱ्या अर्थाने आपली असते.. आपला सगळ्यात विश्वासहार्य' जोडीदार' दिवस साल मात्र हरामखोर ...फक्त दुसर्यासाठी अतोनात पळायला लावणारा आणि शेवटी सगळं तुमच्याच साठी आहे वेड्या,म्हणून भूल देणारा... "थकणं" हा शब्दच याच्या शब्दकोशात नाही आणि असलाच  तर त्याच्याशी याचं काही देणं लागत नाही... रात्र मात्र अगदी काळजी करणारी... अगदी आईप्रमानं... ' मी थकलोय ' अस तिला अजिबात सांगायची काही गरज नाही ...ती आपोआप सगळं समजून या स्वार्थी जगापासून काही काळासाठी एकदम शांत  आणि दूर नेऊन ठेवते ...जिथं आपला फक्त आपल्याशी संबंध असतो... ती आणि आपण सोडून कशाचाही  त्यात व्यत्यय नाही ... " रात्र " आकाशात स्तब्ध चांदण्याना आपल्या ही हातातून  नकळत निस्टलेल्या ताऱ्यांची पुन्हा आठवण आणि मोजणी करून देते ... स्पदनांच्या आवेगांना स्वैर करून त्यांन...

दुःखाची व्याख्या...😉

                दुःख ही एक 'नॉर्मल' भावना म्हणून येते, तेव्हा ती एखाद्या लाटेसारखी असते.ती येते आणि ओसरतेही.पण काही वेळा काही माणसांची मन:स्थिती सतत दुःखी राहते.हे दुःखं त्यांना सगळीकडे जाणवतं घरी, कामाच्या ठिकाणी,मित्रमंडळी मध्ये देखील.या मन:स्थिती मुळे त्याच्या कार्यक्षमतेवर आणि नातेसंबंधावर परिणाम होतात आणि एकूणच आयुष्याची गुणवत्ता खालावते.त्यावेळी ते नुसतं दुःख नसतं.तो असतो 'नैराश्य' नावाचा मानसिक आजार.                            आपल्या आयुष्यातील कृष्ण-छटा.काही फिकट तर काही गडद. काही सौम्य राखाडी तर काही भीषण काळ्या-अंगावर येणाऱ्या,काहीही असलं तरी एक गोष्ट नक्की.या छटा प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहेत.त्या स्वीकारून जो पुढे जातो तोच आनंदात असतो. आनंदी माणूस म्हणजे दुःख नसलेला मनुष्य नव्हे, तर दुःखालाही आनंदाने आपलंसं करणारा माणूस. कृष्ण-छटा स्वीकारून आनंदाने जगणं म्हणजे खरा अर्थ होतो. देव मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने हे सर्व मी एका गोष्टीवर श्रद्धा ठेवून लिहितो आहे. अंधारा भ...

दुःखाची व्याख्या...😉

दुःखाचं मानवी आयुष्यातील स्थान काय...?          स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातील दुःखांचा वेध घेता घेता एक गोष्ट नेहमी जाणवत आलेली आहे.दुःखाला आपल्या आयुष्यात निश्चित एक महत्त्वाचं स्थान आहे.अंधार आहे म्हणून आपल्याला प्रकाशाची किंमत कळते.गुलाबाचं फुल हातात अलगदपणे नेमकं कुठे धरायचं ते काटे आपल्याला शिकवतात.सुखाची चव गोड असते परंतु दुःखाची चवच महत्त्व सांगून जाते.सुख आणि दुःख ह्याच्या प्रकृती मुळातच वेगळ्या आहेत.सुखाची गंमत क्षणिक असते, आणि ती वरवरची असते,म्हणून आपण सुखाचा हव्यास धरून असलो तरी त्यातून आपण फारसं शिकत नाही.दुःख मात्र खोलवर जातं.अंतर्मनात ते बराच काळ राहतं.तिथे ते मनात घर करून परिणाम करतं.म्हणूनच आपल्याला बदलायला लावण्याची ताकत दुःखात असते,आपल्या आयुष्यात येणारी लहान-मोठी दुःखं आठवून पहा:-परीक्षेतलं अपयश,आर्थिक नुकसान,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,प्रेमात एकमेकांशी न पटल्यामुळे विभक्त होणं,आजार,अपंगत्व आणि अशे बरेच कितीतरी..                  या प्रसंगांमध्ये आपण वरवर पाहता निष्क्रिय झालेलो दिसत असलो,तरी तेव्...

इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट

जेव्हा एखादा माणूस चुक करतो आणि तुमच्या समोर माफी  मागण्या ऐवजी तुम्ही कसे चुकीचे आहात सांगत असेल,आणि  झालेली चूक तुमच्या अंगलट घालत असेल तर त्याला इगो म्हणतात😒, आणि त्याच परिस्थिती मध्ये ज्याने चूक केलीली नसेल तरीही प्रत्येक वेळी सॉरी सॉरी बोलत असेल आणि सॉरी बोलून जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे जातं त्यावेळी तुम्ही तुमची नसलेली चूक कबूल नाही करत त्याला सेल्फ रेस्पेक्ट म्हणतात...🤗 ह्यातच मग एवढ्या तेवढ्या कारणांमुळे नात्याला तडा जातो आणि दुरावा निर्माण होतो,त्यावेळी कोणीही मध्यस्थी केली तरीही आपली चूक असून सुद्धा आपण मान्य करायला तयार होत नाही कारण तेव्हा च्या क्षणी आपली सहन करण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली असते😳.अश्यावेळी ह्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या एकदम खास मित्रांशी बोलणे किंवा गप्पा मारणे,निदान कमीत कमी त्यांच्या आवर्जून दोन शिव्या तर खाणे.आता तुम्ही म्हणाल की ह्याने काय होतं..?🤔 तर आपल्या आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारल्या की असलेलं ओझं कमी होतं आणि नाहीच झालं तर तेवढ्यापुरतं मनाला समाधान तरी मिळतं.(असं माझं मत आहे😉) प्रत्येक माणसाला माहिती असतं की आप...